Friday, March 13, 2015

.....आदर्श ???

फाल्गुन कृ. ७, शिवशके ३४१

आज सकाळी ऑफिसला निघायला जरा उशीरच झाला. share ऑटो साठी हि रांग लागली होति. एकदा उशीर झाला कि सगळ्या गोष्टी त्याला पूरकच होऊ लागतात का, असा कधी-कधी प्रश्न पडतो.

​रिक्षातून उतरून sky-walk कडे चालू लागलो. जिने चढून दोन-चार पावलं ​
​पुढे गेलो असेन, तिथे एक व्यक्ती ​
​​ 
कुठलेसे pamplets वाटत होती. ​
​माझ्यापुढेही त्याने ते धरले. मीही ते घेतले आणि बघतो तर,
​घरातून काम करणाऱ्या (work from home) (?) कंपनीची जाहिरात करणारी pamplets होती. काहीही कचरा खाली फेकू नये या नेहमीच्या सवयीने म्हणून मी ते बगेच्या कप्प्यात ठेऊन दिले. चार-पाच पावलं पुढे गेलो तर, तेच pamplets सगळीकडे पडले होते. बहुदा, ज्यांना गरज नाही अशा लोकांनी ते तिथेच sky-walk वरच फेकून दिले होते. मनात आलं ज्या लोकांना गरज नाही ते हे घेतात तरी कशाला? बरं घेतले तरी ठीक, निदान कचरा पेटीत तरी टाकू, इतका साधा विचार डोक्यात येत नाही? पण नाही, इथे पडलीये कोणाला?, आपल्या बापाचं काय जातं? अशाच अविर्भावात काही जण वावरतात.

क्षणात मला गिरिमित्र संमेलनातील अथिति व महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे शब्द आठवले. गड-किल्ल्यांवर 'हौशी पर्यटकां' कडून केला जाणारा कचरा याचे कारण या गड-किल्ल्यांवर कुणाची मालकी नाही, असे त्यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी योग्य आहे. हीच मानसिकता सर्व सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर पाहायला मिळते. कोणीही उठतो आणि वाट्टेल तिथे कचरा फेकतो, कोणी पान खाऊन थुंकतो, कोणी सिगारेट, माव्याची रिकामी pakets, तर कुणी chocolates चे wrappers टाकतो. हे सगळ करणारी लोकं आपल्या घरातही अशीच वागतात का ? नाही ना.  मग रस्त्यांवर, सार्वजिनक ठिकाणीच हे का? हे सगळ आपल्या मालकीच नाही म्हणून? पण खरच असं म्हणता येईल? खर तर ह्या  सार्वजनिक मालमत्ता सर्वांच्याच मालकीच्या  आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या पैशातूनच उभ्या केलेल्या आहेत. मग त्या आपल्या आपणच जपायला नकोत? आणि स्वच्छ सुंदर परिसरात राहायला कुणाला आवडणार नाही? मग कुणीतरी आपल्यासाठी साफ-सफाई करेल याची वाट पहायची का? आणि पुढच्या पिढीसाठी आपण काय आदर्श ठेवायचा याचा विचार को का करायला ?

 - भटक्या योगी

1 comment: