Saturday, February 28, 2015

.....आठवण आयुष्यातल्या अतुट क्षणाची


.....आठवण पहिल्या नजरेची
...आठवण पहिल्या भेटीची
.....आठवण पहिल्या स्पर्शाची
...आठवण दिल्या-घेतल्या वचनांची
.....आठवण ओल्या हळदिची
...आठवण सप्तपदींची
.....आठवण पहिल्या पावलांची
...आठवण वाटलेल्या सुख-दुःखांची
.....आठवण तुझ्या-माझ्या नात्याची
...आठवण आयुष्यातल्या अनमोल दिवसाची
.....आठवण तुझ्या-माझ्या बंधनाची
.....आठवण आयुष्यातल्या अतुट क्षणाची

Thursday, February 26, 2015

…रिटर्न जर्नी

फाल्गुन शु. ८, शिवशके ३४१


करी रोड स्टेशन ला बसलो होतो. "ठाणे स्लो पकडू, आरामशीर बसून जाऊ" असा स्वतःला सांगत सिएसटी कडे जाणार्या गाड्या पाहत होतो. साधारण ९.२५ च्या दरम्यान सिएसटी लोकल आली. जनरल डब्यातून "ती दोघं" उतरली . एक पुरुष एक स्त्री. साधारण  ३५-४० वय असेल. दोघाच्या हातात लाल-सफेद काठी. तो पुरुष त्या स्त्री च्या खांद्यावर हात ठेवून चालत होता . ठाण्याच्या दिशेला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी उभे रहिले. त्या पुरुषाने खिशातून दोन मुठी भरून चिल्लर काढली आणि त्या स्त्री च्या हातात दिले. तिने ते तिच्या पिशवीत ठेवले. (दोघांच्या अंगावर मळलेले आणि थोडे फाटके कपडे होते). मी शांतपणे पाहत होतो. अंबरनाथ लोकल आली. दोघे त्यात बसून गेले. 

माझे काका पण नेत्रहीन होते. घाटकोपर स्टेशनला खेळणी विकायचे. अधून मधून ठाण्याला आमच्या घरी पण यायचे. दिसत नसून ते येतात कसे याचा मला नवल वाटायचं. नंतर त्यांना  बस stop वर सोडायला मला जाव लागायचं. मला लाज वाटायची त्यांना घेऊन जायला. (कालांतराने मला जाणवलं कि मी चुकीचा होतो)  ते तंबाखू खायचे आणि थुकायचे रस्त्यात. जर चुकून कोणाच्या अंगावर थुकले  तर. मी ओरडायचो त्यांना. "अस करू नका ".  त्यांच्या हातात घड्याळ होते. त्यांना वेळ कळायची. नोटा पण हाताने चाचपून कळायच्या. 

आज ते हयात नाही. आज इतर नेत्रहीन भिक मागताना  पाह्तो तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी कधी कोणासमोर हात नाही पसरले. स्वतः कमावले. परीस्थितीशी सामना केला. 

विचारांच्या तंद्रीत होतो तितक्यात परत सिएसटी लोकाल आली पुन्हा तेच दोघे समोरून उतरले. आणि पळत मागच्या डब्यात चढले. मी आश्चर्यचकित. लोकल गेली. पुन्हा विचारांची तंद्री. ठाणे लोकाल काही येत नव्हती. बदलापूर ट्रेन आली. पुन्हा त्यातून तेच दोघे उतरले. परत पळत मागच्या डब्यात. मी आवक होऊन पाहत बसलो. "काय चाललय काय? मला भास होतोय कि हे खरच घडतंय?"… 

पोटासाठी किती हि धावपळ! वाईट वाटलं. पुन्हा सिएसटी लोकाल आली. पुन्हा तेच दोघे उतरले आणि पळत मागच्या डब्यात चढले. आता मला कळून चुकलं कि "त्या दोघांची  परळ-चिंचपोकळी -परळ…रिटर्न जर्नी सतत चालू होती. पोटासाठी.… 


(शेवटी मी टिटवाळा लोकल पकडली…परळ स्टेशन ला पुन्हा तशीच दोघे नेत्रहीन चढले. एक पुरुष एक स्त्री. पुरुषाच्या गळ्यात एक ढोलकी होती आणि एका हातात घुंगरू पण होते. सुरात त्याने गाणं सुरु केला आणि ढोलकी वाजवू लागला. आणि ती स्त्री लोकांपुढे हात पसरून पैसे गोळा  करू लागली… पोटासाठीच…)

 - प्रविण शिंदे 

Tuesday, February 24, 2015

६.५४ ची बदलापूर फास्ट...

फाल्गुन शु. ६, शिवशके ३४१


"६. ५४ ची बदलापूर फास्ट ट्रेन पकडायची आहे. मिळेल ना?" 
स्वतःलाच प्रश्न विचारात घाईघाईत गर्दीतून चालत होतो (पळतच होतो)… 
दादरच्या मेन ब्रिजवर चिक्कार गर्दी…
"कुठून येतात एव्हडी लोक?" वैतागून स्वताशीच पुटपुटत… 
इतक्यात गर्दीत ती दिसली, हळूहळू चाचपडत चालत होती… 
तिला पाहिल, पण ट्रेन पकडायची होती… "जाऊ दे! जाईल ती कशीतरी"… 
पुढे गेलो, परत मागे आलो…"कहा जाना है आपको?"… मी विचारलं… 
"central line पे platform एक पे middle ladies"… मी तिचा हात धरून हळू हळू चालू लागलो, 
वय साधारण ३०-३५ च्या दरम्यान, निळी साडी, काखेत bag, हातात सफेद लाल काठी… 
"कहा जाना है आपको?"… मी विचारल… "मै ट्रेन मे सेल करती हुं,  middle ladies अच्छा पडता है स्टेशन पे उतरके घर पे जाने को". नाव नाही विचारल, कुठे राहते नाही विचारलं… अश्या कितीतरी रोज या मुंबईत आपल्या अपंगत्वावर मात करत उदरनिर्वाह करत असतील, किती त्रास होत असेल त्यांना. पण निर्धाराने, हिमतीने सामोर्या जातात. आपण आपला थोडासा वेळ काढून त्यांना मदतीचा हात देऊ शकतो ना?
शेवटी middle ladies आला. हात सोडून तिला सांगितल "आ गया middle ladies"… 
"thank you भैय्या" ...ती … 
"वेलकम" म्हणत मी पळत सुटलो ७.१० ची कल्याण fast पकडायला…

 - प्रविण शिंदे 

Friday, February 20, 2015

शिवजयंती… !

​फाल्गुन शु. २, शिवशके ३४१​

"आज शिवजयंतीच काय?". 
"अरे हि शिवजयंती आपली नाही, तिथीने येते ती आपली", एक संवाद. 
    
     खर तर शिवजयंतीच्या तिथी आणि तारखेच्या वादात मला पडायचं नाहीये. प्रश्न हा आहे कि शिवजयंती कोणतीही असो त्यादिवशी आपण नक्की काय करतो किंवा काय करायचं ठरवतो ? तर facebook आणि whats app वरून भरभरून शुभेच्छा देतो. काही यापुढे जाऊन मिरवणुका काढतात, पूजा करतात , DJ लावतात. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या विचारांचा आदर कोण ठेवतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो

     शिवरायांनी स्वराज्य निर्माण केल, रयतेला पोटच्या लेकरासारख सांभाळल, जात-भेद मोडीत काढले, अन्यायाला स्वराज्यात थारा दिला नाही. आज आपण काय करीत आहोत ? जय शिवराय बोलून, गाड्यांवर stickers लावणे, पिळदार दाढी-मिश्या ठेऊन कपाळी गंध लावणे म्हणजे आपण शिवकार्य करतोय का ? हे करण्यात काही गैर नाही, पण आपण शिवरायांच्या विचारांच अनुकरण करत आहोत का? खरंच काही समाज उपयोगी कार्य करत आहोत का? आज आपण पाहतो आपल्या आजूबाजूला कितीतरी असे लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, पण आपण त्याकडे किती लक्ष देतो ? खूप कमी लोक आणि संस्था ज्या प्रत्यक्ष गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे, गरजू व्यक्तींना वेळोवेळी मदतीचा हात देण्याचे काम करतात. अशा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतात अस मला वाटत. ​आपण निदान वर्षातल्या या दिवशी तरी अशा सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतो, नाही का ?

- भटक्या योगी